मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकऱ्यांसाठी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!

शेतकऱ्यांसाठी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: माती, खडी रॉयल्टी फ्री! Written by : © Ajay Bhujbal परिवर्तन एक शोध टीम / मुंबई   Published: April 5, 2025 10:10 AM (IST)  मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, घरकूल बांधण्यासाठी, शेतकऱ्यांना स्वतःची विहीर किंवा शेततळे बांधण्यासाठी, तसेच 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजने'अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी लागणारे गौण खनिज (माती, मुरुम, दगड, मातीयुक्त रेती) आता रॉयल्टीमुक्त मिळणार आहे. महसूल व वन विभागाने ३ एप्रिल २०२५ रोजी (शासन निर्णयात नमूद तारीख) याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, विविध शासकीय योजनांतर्गत किंवा पूरहानी टाळण्यासाठी होणाऱ्या गावतळी, शेततळी, शेतविहिरी, पाझर तलाव, नाले, बंधारे, माजी मालगुजारी तलाव (मामा तलाव), आणि लघुसिंचन तलाव (M.I. Tank) यांच्या खोलीकरण किंवा सरळीकरणातून निघणारे गौण खनिज रॉयल्टीशिवाय वापरता येणार आहे. या नि...

आयआयटी दिल्लीत गुंजले वेदांताचे स्वर: आचार्य प्रशांत यांनी विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

आयआयटी दिल्लीत गुंजले वेदांताचे स्वर: आचार्य प्रशांत यांनी  विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद Written by : © Ajay Bhujbal  परिवर्तन एक शोध टीम / नई दिल्ली  Published: April 4, 2025 16:55 PM (IST)  नवी दिल्ली: आयआयटी दिल्लीच्या कॅम्पसमध्ये IIT Delhi मेरे नुकताच एक अनोखा आणि सखोल वैचारिक संवाद अनुभवण्यास मिळाला. आयआयटी दिल्ली माजी विद्यार्थी संघटनेने (IITDAA) आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात, वेदांत विद्वान आणि १६० हून अधिक पुस्तकांचे लेखक आचार्य प्रशांत यांनी विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी जीवन, तत्त्वज्ञान आणि समाजाशी संबंधित ज्वलंत मुद्द्यांवर थेट चर्चा केली. सुमारे सहा तास चाललेल्या या सत्रात आचार्य प्रशांत यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे नैतिक पैलू, हवामान बदल आणि उपभोक्तावाद यांसारख्या समकालीन विषयांवर आपले विचार मांडले. त्यांचे विचार ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने हे गहन विषय उपस्थितांसमोर मांडले, ज्यामुळे सर्वजण चर्चेत खोलवर जोडले गेले. या कार्यक्रमात विद्यार्थ्...

विरोधकांचा सरकारला सवाल ; मुस्लिम खासदारांच्या गैरहजेरीत वक्फ दुरुस्ती विधेयकाला (बिल) मंजुरी.?

वक्फ दुरुस्ती विधेयक (बिल) संसदेत सादर : मुस्लिम खासदारांच्या गैरहजेरीत..? विरोधकांचा सरकारला सवाल Written by : © Ajay Bhujbal  परिवर्तन एक शोध टीम / नई दिल्ली  Published: April 2, 2025 15:53 PM (IST)  नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच वादग्रस्त ठरलेले ' वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक ' सादर केले. गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले असून, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये यावर प्रत्येकी ८ तास चर्चा होणार आहे. सरकारचा आग्रह, विरोधकांचा आक्षेप सरकार हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. सत्ताधारी एनडीएने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहून विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप (whip) जारी केला आहे. एनडीएचे प्रमुख घटकपक्ष असलेल्या टीडीपी , जेडीयू , शिवसेना (शिंदे गट) आणि लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) यांनीही आपल्या खासदारांना सरकारला पाठिंबा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष जेडीयू, टीडीपी आणि विरोधी इंडिया आघाडीतील,...