मुख्य सामग्रीवर वगळा

शेतकऱ्यांसाठी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!

शेतकऱ्यांसाठी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: माती, खडी रॉयल्टी फ्री!


Written by : © Ajay Bhujbal

परिवर्तन एक शोध टीम / मुंबई 

Published: April 5, 2025 10:10 AM (IST) 


मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, घरकूल बांधण्यासाठी, शेतकऱ्यांना स्वतःची विहीर किंवा शेततळे बांधण्यासाठी, तसेच 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजने'अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी लागणारे गौण खनिज (माती, मुरुम, दगड, मातीयुक्त रेती) आता रॉयल्टीमुक्त मिळणार आहे.


महसूल व वन विभागाने ३ एप्रिल २०२५ रोजी (शासन निर्णयात नमूद तारीख) याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, विविध शासकीय योजनांतर्गत किंवा पूरहानी टाळण्यासाठी होणाऱ्या गावतळी, शेततळी, शेतविहिरी, पाझर तलाव, नाले, बंधारे, माजी मालगुजारी तलाव (मामा तलाव), आणि लघुसिंचन तलाव (M.I. Tank) यांच्या खोलीकरण किंवा सरळीकरणातून निघणारे गौण खनिज रॉयल्टीशिवाय वापरता येणार आहे.


या निर्णयाचा फायदा कोणाला?

1. विविध घरकूल योजनेचे लाभार्थी: यांना घर बांधण्यासाठी ५ ब्रासच्या मर्यादेत गौण खनिज रॉयल्टीशिवाय मिळेल.

2. शेतकरी: स्वतःची विहीर किंवा शेततळे बांधण्यासाठी आवश्यक गौण खनिज रॉयल्टीशिवाय वापरू शकतील.

3. शेत/पाणंद रस्ते योजना: 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजने'च्या अंमलबजावणीसाठी लागणारे गौण खनिज रॉयल्टीमुक्त असेल.


या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील आणि विशेषतः पाणंद रस्त्यांच्या कामांना गती मिळेल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली. शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होऊन त्यांना सिंचनाच्या सोयी निर्माण करणे आणि शेतमालाची वाहतूक सुलभ करणे सोपे होणार आहे.


महत्वाचे:

या योजनेसाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून काम पाहतील. ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा इतर शासकीय बांधकामांसाठी हे गौण खनिज वापरल्यास, त्यासाठीची रॉयल्टी मूळ अंदाजपत्रकात समाविष्ट असल्याने, संबंधित कंत्राटदाराच्या देयकातून ती वसूल केली जाईल याची खातरजमा करण्याची जबाबदारी तहसीलदारांची असेल.

या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



मर्यादेचे पालन : घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासची मर्यादा घालण्यात आली आहे, पण प्रत्यक्षात किती खनिज वापरले गेले यावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. या  बाबतीत सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा किती प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच  या योजनेचा लाभा बरोबर प्रशासनावरील अतिरिक्त भार : तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेवर लाभार्थ्यांची पात्रता तपासणे, परवाने देणे, वापराच्या नोंदी ठेवणे आणि गैरवापर टाळण्यासाठी देखरेख करणे, या कामांचा अतिरिक्त बोजा पडू शकतो. हे सुध्दा डावलून चालणार नाही.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...