आषाढी वारी आधीच वारकाऱ्यांचा हिरमोड: देहू संस्थानाचा मोठा निर्णय ! Write & Published by: Ajay M. Bhujbal Team' Drishti Pramoters Last Updated: May 20, 2025 17:58 PM IST पुणे: आषाढी वारीला अवघे काही दिवस शिल्लक असताना, पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेकडो वर्षांची परंपरा मोडून देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे बैलगाडीधारक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यावर्षीपासून पालखीचा चांदीचा रथ आणि चौघड्याची गाडी ओढण्यासाठी संस्थान स्वतःच्या मालकीची बैलजोडी खरेदी करणार आहे. वर्षानुवर्षे, आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपल्या बैलजोडीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळवणे हे एक स्वप्न आणि श्रद्धेचा भाग असे. यासाठी अनेक शेतकरी अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या बैलांची काळजी घेत असत आणि या संधीची आतुरतेने वाट पाहत असत. देहू ते पंढरपूर या प्रवासात पालखी रथाला ओढण्याचा हा मान त्यांच्यासाठी केवळ एक काम नव्हते, तर तो एक आध्यात्मिक अनुभव आणि परंपरेचा अविभाज्य भाग होता. मात्र, देह...
नमस्कार मित्रांनो..! तुम्हा सर्वांचे या ब्लॉग पेज वर आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. आपणास या ब्लॉग वर सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, शैक्षणिक,कला, क्रिडा,प्रवास, विश्लेषण, चालू घडामोडी आणि ज्ञानवर्धक गोष्टींबाबत वाचायला मिळेल..! तर सबस्क्राईब करा फॉलोअप घेत रहा..!भेटत रहा या आधुनिक तंत्रज्ञानाचा गावात..! "Vatsaru - आम्ही शब्दांचे वारकरी" आपल्या माहिती साठी लिंक : https://vatsaruofwords.blogspot.com/