मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेची खूशखबर, या मार्गांवर धावणार 18 विशेष गाड्या, तपासा तपशील.....

Indian Railways Special Trains : डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मध्य रेल्वे 18 विशेष गाड्यांसह 12 उप-शहरी ट्रेन चालवणार आहे.



Written by : © Ajay Bhujbal 

परिवर्तन एक शोध टीम / नई दिल्ली 

Published: December 05, 2023 21:30 PM (IST) 


Indian Railways Special Trains : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे (Central Railway) ने महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वे विभागाकडून सुचना प्रसारित करण्यात आली आहे,  ज्या मध्ये प्रवाशांना कळवण्यात आले आहे की - 6 डिसेंबर रोजी 18 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 12 अतिरिक्त लोकल सेवा चालवल्या जातील. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी दरवर्षी ६ डिसेंबर हा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हणून साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर दादर आणि मुंबईतील इतर स्थानकांवर रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (GRP) चे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध ठिकाणांहून लोकांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी, मध्य रेल्वे मंगळवार आणि बुधवारी 12 अतिरिक्त उपनगरी सेवा आणि 18 लांब पल्ल्याच्या गाड्या चालवणार आहे, ज्यापैकी आठ गाड्या मुंबईच्या दिशेने आणि 10 गाड्या मुंबई कडून चालवल्या जातील.


या विशेष गाड्या धावत आहेत : 

* विशेष गाडी क्रमांक 07058 आदिलाबाद येथून मंगळवार, 05/12/2023 रोजी सकाळी 07:00  वाजता सुटेल आणि दादरला दुसऱ्या दिवशी 3.30 वाजता पोहोचेल.

* विशेष गाडी क्रमांक 07057 दादर हून गुरुवार, 07.12.2023 रोजी 01.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.00 वाजता आदिलाबादला पोहोचेल.

ही गाडी आदिलाबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथे थांबेल.


या 12 उप-शहरी गाड्या चालवण्यात येणार आहेत ; मेन लाईन – अप स्पेशल – परळ-कल्याण विभाग : 

* कुर्ला-परळ स्पेशल कुर्ल्याहून 00.45 वाजता सुटेल आणि 01.05 वाजता परळला पोहोचेल.

* कल्याण-परळ विशेष गाडी कल्याणहून 01:00 वाजता सुटेल आणि 2:30 वाजता परळला पोहोचेल.

* ठाणे-परळ विशेष गाडी ठाण्याहून 02.10 वाजता सुटेल आणि 02.55 वाजता परळला पोहोचेल.


मेन लाइन - डाऊन स्पेशल - कल्याण-परळ विभाग

* परळ-ठाणे स्पेशल परळहून ०१.१५ वाजता सुटेल आणि १.५५ वाजता ठाण्याला पोहोचेल.

* परळ-कल्याण स्पेशल परळहून 02.25 वाजता सुटेल आणि 03.40 वाजता कल्याणला पोहोचेल.

* परळ-कुर्ला स्पेशल परळ येथून 03.05 वाजता सुटेल आणि 03.20 वाजता कुर्ला येथे पोहोचेल.


हार्बर लाइन – अप विशेष - पनवेल-कुर्ला विभाग

वाशी-कुर्ला स्पेशल वाशीहून 01.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.10 वाजता पोहोचेल.

पनवेल-कुर्ला स्पेशल पनवेलहून 01.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.45 वाजता पोहोचेल.

* वाशी-कुर्ला स्पेशल वाशी येथून 03.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 03.40 वाजता पोहोचेल.


हार्बर लाइन - डाउन विशेष - कुर्ला-पनवेल विभाग

* कुर्ला-वाशी स्पेशल - कुर्ल्याहून 02.30 वाजता सुटेल आणि 03.00 वाजता वाशीला पोहोचेल.

* कुर्ला-पनवेल स्पेशल कुर्ल्याहून 03.00 वाजता सुटेल आणि 04.00 वाजता पनवेलला पोहोचेल.

* कुर्ला-वाशी स्पेशल कुर्ल्याहून 04.00 वाजता सुटेल आणि 04.35 वाजता वाशीला पोहोचेल.


संपूर्ण सुरक्षा व्यवस्था

एका प्रसिद्धीनुसार, मंगळवार आणि बुधवारी दादर स्थानकावर 140 अतिरिक्त RPF कर्मचारी आणि 250 GRP कर्मचारी तैनात केले जात आहेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि कल्याण स्थानकावर 24 अतिरिक्त RPF जवान तैनात करण्यात आले आहेत. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...