काल, तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या यादीतील, म्होरक्या चित्रपट पाहिला. तो चित्रपट पाहून मला काय वाटलं, काय उमजलं हे तुमच्या समोर माझ्या Point Of View मधून मांडतोय..! फक्त दोन-तीन मिनिट देऊन हा लेख वाचा आणि आपलं मत जरूर कळवा..!
आपण माणूस म्हणून, जगायला वावरायला शकतो. तेव्हा प्रत्येकात कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या गोष्टीमध्ये, अथवा एखाद्या कामासाठी पुढाकार घेण्याचे,सामर्थ्य असत. तो पूढाकार घेणे म्हणजे लिडर,म्होरक्या होण्याची लक्षणे ; आणि नेमकं तेच काम नेटाने प्रागतिक मार्गाने पुर्णत्वास घेऊन जाणारा, मार्ग दाखवणारा व्यक्ती आणि जो समोर राहून काम पाहतो, तो म्होरक्या. प्रत्येकात एक म्होरक्या दडलेला असतो.
आपण लहानाचे मोठे होतो शाळेत जातो. शाळेत गेल्यावर त्या शाळेतील दिवसांमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोष्ट येते. एक संकल्पना येते, ती म्हणजे मॉनिटर, लीडर या नावाची. म्होरक्या चित्रपटाच्या अनुषंगाने मी लिहितो आहे. अर्थात मराठी चित्रपट विश्वात, बहुचर्चित दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त यादितील. म्होरक्या चित्रपटाच्या बाबतीत. खऱ्या अर्थाने गेल्यावर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे पुरस्कार, जेव्हा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार अशी उद्घोषणा होते.
तेव्हा जवळपास सर्वच विजेत्यांनी या गोष्टीचा निषेध केला होता. काही मंडळींनी तर पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. अशी धमक दाखविणाऱ्यां पैकी, एका दिग्दर्शकाचं नाव अग्रगण्यपणे येत. ते म्हणजे 'अमर देवकर..!' पुढे अमर देवकर मोरक्या चित्रपट "१२ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात" घेऊन जातात. थाटामाटात निवडक चित्रपटाच्या यादीत म्होरक्या चित्रपटाची स्क्रिनिंग होते. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याचा काळ मराठी चित्रपट आवडिने पाहणारा, प्रेक्षकवर्ग कमी झाला आहे.
(हे माझ वैयक्तिक पातळीवरील मत) आणि त्यातली त्यात गैरव्यवसायिक , राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट पाहणारा प्रेक्षक वर्ग एकदम बोटावर मोजता येईल, एवढा तुरळक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतपतच दिसतो.
(हे माझ वैयक्तिक पातळीवरील मत) आणि त्यातली त्यात गैरव्यवसायिक , राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट पाहणारा प्रेक्षक वर्ग एकदम बोटावर मोजता येईल, एवढा तुरळक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतपतच दिसतो.
अशा परिस्थितीत हे सारे जुगारून, धूडकारत, त्या क्षेत्रात पदार्पण करणे. चित्रपट बनवताना आर्थिक अडचणींवर मात करत,स्वत:ह कडे असलेली शेती विकून. चित्रपट निर्माण करणे. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णकमळ पदक मिळवणे. हे एका ग्रामिण भागातील विशेषतः मराठवाड्याच्या सिमेरेषेवरील बार्शी सोलापूर सारख्या, ग्रामीण भागातील तरुणाने जिद्दीने साकारलेलं नवलाई आणि धाडसाचे ,कार्य म्हणाव लागेल..! तांत्रिकदृष्ट्या या चित्रपटाचा विषय किती तगडा आहे. हे मी सांगू शकत नाही. मात्र कथानक सर्वोत्तम आणि भन्नाट अप्रतिमच आहे.गणतंत्र मानणाऱ्या प्रत्येकाला हा चित्रपट समर्पित आहे.
गावगाड्यात राहणाऱ्या, गावकऱ्यांचे वास्तविक जगणं, जगण्यातला रांगडेबाजपणा, शेळ्याा-मेंढर, कुत्र, नदी, बारव, विहर, म्हैस, गुरढोरं, मंदीर, हे सारे सूत्र पकडून आगळगाव,बार्शी आणि इतर काही ठिकाणी चित्रण करत हा चित्रपट निर्माण झाला. गावगाड्यातील एका कुटुंबावर जेव्हा कुटुंब प्रमुख गेल्याच संकट येते ,त्या कुटुंबाला कुटुंब प्रमुख आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर सोडून जातो.तेव्हा त्या कुटुंबाचे जगण्याचं रडगाणे बाजूला सारत, परिस्थितीवर मात करत जगण्याचा संघर्ष चालू असतो.
मग अशोक सारखं पोर बापाची कमी बसायला लागल्यावर, आकांताने आरडू-ओरडू हुंदके फोडत स्वतःच्या माईला विचारायला लागतं ये माय म्हवा बाप कशान मेला ? आजे म्हवा बाप कशान मेला.? आजी सांगायला लागते, एड्स ने फाशी घेऊन मेला. एड्स का नाय निट केला ..? हा डोकं चक्रावून टाकणारा अशोकचा प्रश्न मार्मिकतेचे दर्शन घडवून द्यायला लागतो.
त्याच अशोकच्या बापाच्या डोक्यावरच्या कर्ज फिटल्याले नसल्यामुळे अशोक नावाचं पोर गुराखी म्हणून गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाच्या घरी सालाने गुराखी म्हणून काम पाहतो. शाळेत हजेरीपटावर नाव असून सुद्धा परिस्थितीमुळं शाळेत न जाता येणे. जि.प्र.प्रा.शाळा आगळगाव,बार्शी अशोक ला मॅडम शाळेत पकडून,बोलून आणायला लावतात. योगायोगाने शाळेत होणाऱ्या गणतंत्र परेडसाठी ; त्याच्या आवाजामुळे अंगभूत,गुणांमुळे निवड होते. निवड झाल्यावर आपली संधी मुकते की काय या भीतीत टरेगिरी करणारा त्याचा वर्गमित्र आणि गावातील वरचढ मंडळींचा पोरगा सांगायला लागतो की अशोकला कुणी परेड शिकवणार नाही शिकवली तर खबरदार.
या परिस्थितीमध्ये अशोक च्या डोक्यात खुळ भरतं. मनात इच्छा निर्माण व्हायला लागतं. की आपण परेड करायची ; आणि लिडर व्हायचं. मग शोधाशोध सुरू होती की मला गावात कोणाकडून परेड शिकता येईल. म्हाताऱ्या गुराख्याला विचारपूस. गोमतेर आबा (रामचंद्र धूमाळ). सांगायला लागतात की माझा जन्म गणतंत्रता दिवशी झाला त्यामुळे माझं नाव गणतंत्र ठेवण्यात आले. आणि त्याचा अपभ्रंश गोमतेर आबा झाला... दिवसागणिक पायदळी वाट तुडवताना सतराशेसाठ काटे मोडतात पायांची चाळण होते. आबा ते माळरानावर राहणार.आन्या खरंच वेड आहे का उगिउगी करतय व्हय. येड येड कस होतय ..? येड्यालच माहीती आपण किती येड हायत ते शाहण्याला काय माहित..?
येड येड नसतय, येड शाहण्याला यड्यात काढत्यात ते निराळ.
'जास्त इचार केल्यावर.' आणि अशोक ने स्वत:हच्या मेंढीला दिलेलं हिरोईन कटरिना नाव. आणि इतर प्रत्येक संवादातील मर्मभेद, मार्मिकता अप्रतिम पद्धतीने लेखकाने मांडण्याचं काम केलेलं दिसून येत आहे.
'जास्त इचार केल्यावर.' आणि अशोक ने स्वत:हच्या मेंढीला दिलेलं हिरोईन कटरिना नाव. आणि इतर प्रत्येक संवादातील मर्मभेद, मार्मिकता अप्रतिम पद्धतीने लेखकाने मांडण्याचं काम केलेलं दिसून येत आहे.
अमर देवकर यांनी साकारलेल्या दोन्ही भुमिका वाखाण्या जोग्या आहेत विषेश म्हणजे वेड्याची भुमिका..! गोंधळाच्या वातावरणातील सिन, मुंगळे इत्यादी कॅमेरा अँगल चित्रण तर फारच उत्तम रीतीने घेतले...! शिक्षकांचा, विद्यार्थी-विद्यार्थिनी , प्राजक्ता आणि इतर भूमिका,पात्र, त्यांच्यावर दिग्दर्शकांना घेतलेली मेहनत सार्थकी लावण्याच काम सर्व कलावंत मंडळींनी केलं असं म्हणायचं लागेल...!
परिस्थितीपुढे लाचार. बुट घेण्याइतपत पैसे नाहीयेत. परेड शिकायची तरी इच्छा मात्र तीव्र..! शाळा शिकून कोणाचं भलं झालंय,असं बोलणारा पक्का नेमबाजी करणारा त्याचा मित्र. परेड शिकतांची कसरत,सराव...! मुलाची आई मुकी असते त्याला आपली आई जात्यावर गाणं गाताना दिसावी ही स्वप्नवत अनुत्तरीत राहणार सत्य..! गावातील इतर पात्र, भूमिका. आणि चित्रपटाच्या शेवटाकडे चित्रपट सांगायला लागतो की प्रत्येक गोष्टींच्या वळणावरती राजकारण घडत किंवा घडवलं जातं.
सामान्य गुराख्या माध्यमातून बोलत जाणारा, म्होरक्या. राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा, परिस्थितीची जाणीव. लीडर म्होरक्या सर्वांना सोबत,घेऊन चालायला लागतो..! अधिकार गाजवत नसतो... वगैरे वगैरे..! एकंदरीत समाजाचे अंतर्मन आणि समाज भान जागृत करणारी ही कलाकृती आहे. चित्रपट निर्मिती मध्ये असलेली सर्व टीम अमर देवकर,अभय चव्हाण ,रामचंद्र धुमाळ, उमेश मालन , अनिल कांबळे, अगदी सर्वांचे अभिनंदन... आणि तुम्हा सर्वांना सांगतो. आपण सर्व प्रेक्षक म्हणून आणि गणतंत्र मानणारे एक सुजाण नागरिक म्हणून हा चित्रपट आवर्जून सर्वांनी पहावाच एवढीच माफक अपेक्षा..! आणि नक्कीच तुम्हा सर्वांच्या पसंतीस उतरले असा हा चित्रपट आहे.! आम्ही सर्व जण साहाय्यक म्हणून अमर सर आणि टीम म्होरक्याचा भाग समजतो स्वत:ला आज कैक ठिकाणी म्होरक्या चित्रपटचे शो लागले नाहीत ते नक्कीच सर्वत्र लागतील... आपण फक्त मराठी चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे..!
पाच स्टार ...पैकिच्या पैकी.⭐⭐⭐⭐⭐
✍️ अजय भुजबळ, परभणी, (औरंगाबाद मराठवाडा)
मो.नं:- 8180941255 / 9404910594
मो.नं:- 8180941255 / 9404910594

लेख सुंदर लिहिला आहे आणि चित्रपट तर अप्रतिमच आहे.
उत्तर द्याहटवाThanks Sachin
हटवाखुप छान...!
उत्तर द्याहटवाLay bhari Ajay👏
हटवाहा चित्रपट अप्रतिम आहेच. पण चित्रपटाचे नवा खूप भारी आहे...
उत्तर द्याहटवाMST BHAU
उत्तर द्याहटवाThanks chandrashekhar thaware
हटवाम्होरक्या म्हणजे अभावातून प्रभाव दाखविणारा अतिशय नितांतसुंदर चित्रपट. सर्वांनी आवर्जून पहायला हवा.
हटवाKhup chan
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाVery nice 👌👌👌
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवा
हटवाधन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!
छान लिहिल आहे 😊
उत्तर द्याहटवाखुप छान लेख लिहिला पाटील ����
उत्तर द्याहटवाधन्यवाद राहूलजी..!
हटवाअप्रतिम लिखाण .....धावत्या जगात कानाडोळा होत असलेल्या मराठी चित्रपटाकडे मराठी माणसाचं मन वळाव अस सुंदर लिखाण आपण केलंय....आणि चित्रपट हा खराखुरा ग्रामीण जीवन आणि ग्रामीण जिद्द दाखवून देणार आहे हेच यावरून लक्षात येत...
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद...! सहमत आहे आपल्या मताशी
हटवालेख छान आहे .
उत्तर द्याहटवाKhup chan lekh patil
उत्तर द्याहटवा
हटवाधन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!
Patil aapal likhan khupach Apratim aahe manapasun aawadal
उत्तर द्याहटवाLekin khup Chan Aahe patil
उत्तर द्याहटवाधन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!
हटवाखूप छान लेखन आहे सर...अमर सर thank you या चित्रपटातून आम्हाला खूप काही शिकण्यासाठी मिळालं आणि प्रत्येकात एक म्होरक्या दडून असतो फक्त ते आपल्याला धैर्याने उजेडात आणायला पाहिजे हे या चित्रपटातून स्पष्टपणे कळून येत...। खरच येड शहाणा असतो सगळ्यांना येड्यात काढत असतो वा सर एकच नंबर.......!
उत्तर द्याहटवाpoojakyama
हटवाThanks..pooja ji.. कदाचित आपली ओळख नाहीय असो... ओळख होईलच ही सदिच्छा@Ajay_Bhujbal
हटवाखुप छान
उत्तर द्याहटवाThanks Shyam
हटवाNice thinking
उत्तर द्याहटवाThanks gajuu
हटवाLay bhari Ajay 👏
उत्तर द्याहटवाधन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवाThanks Amol
हटवाखुप छान लेख आहे. 👌👍
उत्तर द्याहटवाउत्कृष्ठ समीक्षा....
उत्तर द्याहटवाधन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!
हटवाखूप छान प्रकारे चित्रपटाचं विश्लेषण केलंय तू अजय चित्रपट पाहायला खूप आवडेल😊😊
उत्तर द्याहटवाधन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!
उत्तर द्याहटवा