मुख्य सामग्रीवर वगळा

दूर्देव तुमचं आमचं आणि सर्वांचं: 'GenZ' आणि नेपाळमधील ग्रंथालयाच्या राखेचा अर्थ

 नेपाळ, तिथले ग्रंथालय जळाले, इतिहास राख झाला: नेपाळच्या घटनेतून आपण काय शिकलो..?


विश्लेषणात्मक लेख 

 Written by : © Ajay Bhujbal 

परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters 

Published: September 14, 2023 

23:30 PM (IST)


दूर्देव तुमचं आमचं आणि सर्वांचं: नेपाळमधील ग्रंथालयाच्या राखेचा अर्थ 

आज सकाळी नेपाळच्या सिंहदरबार लायब्ररीची बातमी वाचून मन सुन्न झालं. हजारो वर्षं जपलेली स्मृती, अनेक पिढ्यांनी जतन केलेला वारसा, आणि आपल्या सामूहिक विचारविश्वाचा पाया पिसाळलेल्या गर्दीने काही तासांत राखेत कालवला. माझ्या नेपाळच्या प्रवासाच्या यादीत असलेली ही लायब्ररी आता केवळ एक जळलेला अवशेष म्हणून शिल्लक आहे. १२व्या शतकात झालेल्या उठावानंतर ती पुन्हा उभी राहिली होती. पण २०२५ च्या 'GenZ' उठावात ती कायमची संपली.

सांस्कृतिक वारशाची अपरिमित हानी 

या घटनेकडे केवळ अपघाती नुकसान म्हणून पाहता येणार नाही. हा सांस्कृतिक वारसा जळणे म्हणजे काय लेव्हलचा तोटा आहे, हे शब्दांत किंवा आकड्यांत सांगता येणार नाही. 'द हिंदू' आणि 'टाईम्स ऑफ इंडिया' सारख्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या ग्रंथालयात चर्यापदासारखा ९व्या शतकातला प्राचीन संग्रह, मध्ययुगीन साहित्यकारांची लिखाणं, आणि हिंदू-बौद्ध समाजाच्या आध्यात्मिक परंपरेचे हजारो वर्षं जुने अनेक ग्रंथ होते – हे सगळं काही क्षणात संपलं. मला हे सगळं इतकं वैयक्तिक का वाटतंय, याचं कारण एकच आहे: जेव्हा पुस्तकं, शिल्पं, चित्रं आणि ऐतिहासिक साधनं नष्ट होतात तेव्हा मला माझं आयुष्य शून्य वाटायला लागतं. मी ज्या संस्कृतींत जन्मलो, जीने साहित्य-संगीत-कला ह्यांना जीवनाचा अविभाज्य भाग मानलं, ज्या ज्ञानपरंपरेतून मला स्वतःला घडवण्याची संधी मिळाली, ती राख होताना पाहणं असह्य आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती आणि क्रूर वास्तव 

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, इतिहासात असे प्रसंग वारंवार घडलेत. जेव्हा संघर्ष पेटतो तेव्हा सर्वप्रथम जळतात ती ही 'soft targets'. पण पुस्तकं, शिल्पं, कला ही समाजाचं 'soul' (आत्मा) असतात. आणि आत्मा नष्ट झाला की काय अस्तित्व राहतं?

 उदाहरणार्थ: इसवी सन २००३ मध्ये, अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यावर बगदादमधील नॅशनल लायब्ररी अँड आर्काइव्ह्ज ऑफ इराक जाळली गेली. त्यात प्राचीन मेसोपोटामियन संस्कृतीचे दुर्मिळ दस्तावेज, हस्तलिखिते आणि कलाकृती नष्ट झाल्या. ही घटना केवळ इराकी जनतेची नव्हे, तर संपूर्ण मानवजातीची हानी होती. नेपाळमधील घटना याच क्रूर वास्तवाची पुनरावृत्ती आहे.

या युवकांच्या संतापामागे नक्कीच काही कारणं असतील. अन्याय, बेरोजगारी, राजकीय ताण… पण ‘मॉब जस्टिस’ (गर्दीने केलेला न्याय) हा कायम क्रूर आणि मूर्खपणाचा असतो. अशा हिंसेतून फक्त हानी जन्माला येते. लायब्ररी जाळणं म्हणजे स्वतःच्या इतिहासालाच अग्नी देणं. आणि इतिहास राखेत गेला की भविष्य रिकामं होतं.

चुक कोणाची.?

'हे GenZ बिनडोक आहेत, त्यांना प्राचीन ग्रंथांची काय अक्कल असणार?!' हे म्हणणं फार सोपं आहे. या जाळपोळ करणाऱ्या झुंडीचं समर्थन होऊच शकत नाही, पण त्याचबरोबर मला असंही वाटतं की तितकीच चूक तिथल्या नेतृत्वाची आहे. ज्यांनी हे आपलं 'heritage' (वारसा) आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे अशी मूल्यंच कधी समाजात रुजवली नाहीत. अनेक माध्यमांनी दिलेल्या व्हिडियोजमध्ये हे दिसून येतंय की नेपाळच्या जाळपोळीत सगळे पर्यटकांना व्यवस्थित प्रोटेक्ट करत आहेत. कारण पर्यटक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत हे त्यांना कळतंय. हे पुस्तकांबाबत का नाही होऊ शकलं?

आज नेपाळचं दुःख पाहताना मला हे जाणवतंय की जगात कुठेही अशी घटना घडते तेव्हा तोटा आपल्या सर्वांचाच झालेला असतो. कारण ज्ञानाला सीमा नसतात, संस्कृतीला राष्ट्रीयत्व नसतं आणि मॉबला डोकं नसतं. ही केवळ नेपाळची नव्हे, तर आपल्या सर्वांची हानी आहे. एका पिढीने गमावलेलं ज्ञान पुन्हा मिळवता येणार नाही आणि त्याची किंमत मोजणंही शक्य नाही. ही घटना आपल्याला एक कटू सत्य शिकवून गेली आहे: ज्ञानाच्या मंदिरांचं रक्षण करणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे, आणि ते विसरलो की त्याची किती मोठी किंमत मो

जावी लागते.

 
काठमांडू - नेपाळ मधील आज घडीचे सिंह दरबार लायब्ररी ची स्थिती आणि दृश्य 


बुद्धांचे विचार विसत आहे नेपाळ भूमी..?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...