मुख्य सामग्रीवर वगळा

आदिवासी आणि श्रमिकांचा आवाज हरपला ; नर्मदा बचाव आंदोलनात होता सक्रिय सहभाग

संघर्षाची धगधगती मशाल जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम कर्णिक काळाच्या पडद्याआड 


Updated: November 02, 2022 06:59:54 pm

मंचर, पुणे - जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शाश्वत संस्थेच्या संस्थापक कुसुम कर्णिक (वय-९०) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता. २) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पुणे येथे सुविधा नर्सिंग केअर सेंटरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वास्तव्य मंचर (ता.आंबेगाव) येथे होते. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल केले होते.

त्यांच्यामागे मुलगा सौरभ आनंद कर्णिक/कपूर व सून कल्याणी सौरभ कर्णिक/कपूर आहेत. ‘शाश्वत’ संस्थेच्या माध्यमातून आंबेगाव, खेड तालुक्यात आदिवासी दुर्गम डोंगरी भागात त्या १९८० पासून काम करत होत्या. आदिवासींनी उत्पादित केलेल्या हिरडय़ाला बाजारभाव मिळवून देण्यासाठी, स्थानिकांसह आहुप्याची देवराई वाचवण्यासाठी त्यांनी लढा उभारला होता.

सरकारच्या रोजगार हमी योजनेत ‘पडकई’चा समाविष्ट करण्यासाठीचे आंदोलन, हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) धरणग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी, आदिवासी, दलित, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध सातत्याने सत्याग्रह, आंदोलनं करणाऱ्या व अन्यायाला वाचा फोडणाऱ्या दुर्गा अशी त्यांची ओळख होती. 'नर्मदा बचाव' आंदोलनात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासमवेत त्यांचा सक्रीय सहभाग होता. आदिवासी मच्छीमार व्यावसायिकांना प्रशिक्षण व रोजगार, प्रौढ साक्षरता वर्ग त्यांनी सुरु केले होते. निवासी शाळा, दहा बालवाड्या व २५ अभ्यास वर्ग त्यांनी सुरु केले आहेत. आदिवासींची ताई या नावाने त्यांना ओळखले जात होते.
‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या संस्थेचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अत्यंत बुहमानाचा समजला जाणारा ‘इक्वेटर इनिशिएटिव्ह’ हा पुरस्कार २०१२ मध्ये ‘शाश्वत’ संस्थेला मिळाल्यानंतर आंबेगाव तालुक्याचे नाव सात समुद्रापार गेले. त्याच बरोबर त्यांना लोकसत्ता वृत्तपत्रांच्या माध्यमातून २०१७ सालचा नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात आले होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...