मुख्य सामग्रीवर वगळा

केंद्र सरकारचे निर्णायक पाऊल! गोव्यातील अनुसूचित जमातींसाठीच्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी

 केंद्र सरकारचे निर्णायक पाऊल! गोव्यातील अनुसूचित जमातींसाठीच्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी


पणजीः- 05 ऑगस्ट 2025 गोव्यातील अनुसूचित जमातीला विधानसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले विधेयक लोकसभेने मंगळवारी (05 ऑगस्ट) मंजूर केले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गोवा राज्याच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्व पुनर्समायोजन विधेयक, २०२५ चर्चेसाठी आणि मंजूरीसाठी सादर केले. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले.


हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे ‘एक्स’ या सोशलमिडीया प्लॅटफॉर्मवर आभार मानले आहेत. त्या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, विधेयक संमत झाल्याबद्दल मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. हे भाजप सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यश आहे.

या निर्णयामुळे समावेशक प्रशासन आणि आदिवासी सक्षमीकरणासाठी मोदी सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित होत असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.


या ऐतिहासिक निर्णयाबद्दल गोव्याचे सभापती श्री. रमेश तवडकर, आमदार श्री. गणेश गावकर, भाजप गोवा अध्यक्ष श्री. दामू नाईक, उत्तर गोवा जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. धाकू मडकईकर, भाजप दक्षिण गोवा अध्यक्ष श्री. प्रभाकर गावकर, श्री. अँथनी बारबोसा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

२०११ च्या जनगणनेनुसार गोव्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या अधिक आहे. २०११ मध्ये गोव्याची एकूण लोकसंख्या १४,५८,५४५ होती, ज्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या २५,४४९ होती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या १,४९,२७५ होती. सामाजिक असमानता दूर करणे हा या विधेयकामागचा उद्देश असून आता अनुसूचित जाती जमातीच्या समुदायालाही संविधानात दिलेल्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हे विधेयक गेल्या वर्षी म्हणजे ६ ऑगस्ट २०२४ रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते, परंतु आता ते मंजूर झाले आहे. संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात लोकसभेने मंजूर केलेले हे पहिले विधेयक आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...