मुख्य सामग्रीवर वगळा

परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा: कुंभारीच्या सरपंच महिलेला स्वातंत्र्य दिनी लाल-किल्ल्यावर आमंत्रण

"गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या कुंभारीच्या सरपंच पार्वती हरकळ यांचा लाल किल्ल्यावर सन्मान." परभणी जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे!


परभणीचा गौरव: कुंभारीच्या सरपंच पार्वती हरकळ यांचा लाल किल्ल्यावर सन्मान! 🇮🇳


Written by : © Ajay Bhujbal 

परिवर्तन एक शोध / दृष्टी प्रमोटर्स टीम 

Published: 14 August, 2025 - 12:45 PM (IST)


परभणी, (दि. 14 ऑगस्ट, 2025)

येथील कुंभारी गावाच्या (ता. जिंतूर) सरपंच सौ. पार्वती शेषराव हरकळ यांनी परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यावर्षीच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी त्यांना विशेष पाहुण्या म्हणून आमंत्रण मिळाले आहे.


हा सन्मान केवळ त्यांच्या एकटीचा नाही, तर संपूर्ण परभणी जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातील महिलांचा आहे. देशभरातील २८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून निवड झालेल्या केवळ २१० सरपंचांमध्ये सौ. हरकळ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या २१० पैकी महाराष्ट्रातील १५ सरपंचांची निवड झाली असून, त्यातील ९ महिला सरपंच आहेत, आणि त्यापैकी एक आपल्या परभणी जिल्ह्यातील आहेत.

"गावाचा विकास आणि महिलांचा सन्मान , जे राव न करी ते या उक्तीतून लोकसमुदाय आणि लोक सहभागातून गावाचा विकास  – हीच खरी स्वातंत्र्याची जाणीव!" हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या सौ. पार्वती हरकळ यांच्या नेतृत्वाखाली कुंभारी गावाचा विकास होत आहे. त्यांच्या या निवडीने 'महिलाशक्ती'चा आदर्श पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळेल.


या अतुलनीय कामगिरीबद्दल परिवर्तन एक शोध आणि दृष्टी प्रमोटर्स कडून सौ. पार्वती ताई हरकळ यांचे हार्दिक अभिनंदन!

---

#परभणीचा_अभिमान #स्वातंत्र्यदिन२०२५ #कुंभारीसरपंच #महाराष्ट्राचेमोती #महिलाशक्ती




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...