मुख्य सामग्रीवर वगळा

हिमाचल प्रदेशात 'भाजपा' ने पराभव पत्करल्या नंतर ; मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांची पहिली प्रतिक्रिया

हिमाचल प्रदेश : मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पराभव स्वीकारत, काँग्रेसचे अभिनंदन केले








December 8, 2022 03:42:54 Pm

 हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभव स्वीकारत काँग्रेसचे अभिनंदन केले असून आपण राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, "मी जनतेच्या जनादेशाचा आदर करतो आणि हिमाचल प्रदेशातील जनतेचा आभारी आहे की आम्हाला पाच वर्षे हिमाचल प्रदेशची सेवा करण्याची संधी मिळाली आणि आम्हाला प्रत्येक पाऊलावर त्यांचे समर्थन मिळाले."

“विरोधकांना सत्ता मिळण्याची शक्यता जवळ आली आहे आणि मी त्यांचे अभिनंदन करतो. मी हिमाचल प्रदेशातील सर्व जनतेचे विशेषत: मतदारांचे अभिनंदन करतो कारण त्यांनी निवडणूक प्रक्रियेत खूप सहकार्य केले आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही, जनतेने मोठ्या प्रमाणात मतदानात भाग घेतला. अतिशय उत्साहाने. यावेळी हिमाचल प्रदेशात विक्रमी मतदान झाले."

"हिमाचल प्रदेशात प्रत्येक क्षेत्रात विकास झाला आहे आणि साहजिकच त्याचे श्रेय आदरणीय मोदीजींना जाते."

"मी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षांचे आभार मानतो , त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, या निवडणुकीसाठी त्यांचेही खूप सहकार्य होते. मी अमित शाहजींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो."

"मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन होईल, मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण करावीत. आमचे सहकार्य नेहमीच राजकारणाच्या पलीकडे देखील राहील जेणेकरून हिमाचल प्रदेश पुढे जाईल. जिथे हिमाचलच्या हिताचे नीट रक्षण केले जात नसेल तेथे ; विधानसभेच्या आत आणि बाहेर सत्ताधाऱ्यांना विरोधाचा सामना करावा लागेल.

भूपेश बघेल यांच्या वक्तव्या नुसार जयराम ठाकूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ; पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री जयराम यांना विचारले की भाजपा काहीही करू शकते असे बघेल म्हणत आहेत. त्यावर तुमचे काय मत आहे. तेव्हा जयराम म्हणाले की, "आपल्याला मिळालेल्या जनमताचे रक्षण करणे हे त्याचे काम आहे."

शेवटी ते म्हणाले की, मी काही वेळातच माझा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...