मुख्य सामग्रीवर वगळा

तुझ माझं जमेना तुझ्यावाचून करमेना.? (कॉंग्रेस+पीके रणनितीकार)

सर्व देशभर कॉंग्रेस नेतृत्वाच्या संबंधित चर्चा सुरू असताना. कॉंग्रेस पक्षातूनच नाराजीचा सूर उमटला होता. तो २०२० मध्ये पक्षांतर्गत असंतुष्ट गटाचा उमटलेला नाराजीचा सूर निवळत त्या असंतुष्ट गटातील नेत्यांना समावून घेण्याचा पवित्रा पक्षश्रेष्ठींना महत्वाचा मुद्दा वाटतो आहे. राहूल गांधी आणि प्रियंका गांधी विदेश दौऱ्यावर असतांना सक्रिय पध्दतीने सोनिया गांधी देशभरात विविध राज्यांतील प्रदेश पातळीवर फेरबदल करत नवनवीन नियुक्त्या करत आहेत. त्याच वेळी सोमवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकीय आव्हानांन  सामोरे जाण्याच्या दृष्टीने 'एम्पावर्ड ॲक्शन ग्रुप २०२४ ' ची निर्मिती करत रणनितीकार प्रशांत किशोर यांना सोनिया गांधीनी या मिशन कमिटी येण्याच आव्हान केले. आता तिसऱ्यांदा सोनिया गांधी बरोबर पिकेनी प्रत्यक्ष बोलणी केली तिथे पक्षाच्या ज्येष्ठ नेते मंडळी आणि प्रियंका वाड्रा यांनी पुढाकारा नंतर देखील सोयरे सुतक जुळण्यापूर्विच त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून आल्याची माहिती मिळते आहे.आता आपल्याला पाहणं योग्य ठरेल की बैठका वर बैठका करत असलेल्या प्रशांत किशोर आणि कॉंग्रेस मध्ये नव्यानं चौथ्या बैठकिच्या अनुषंगाने संगनमत होते का ते ; मुळात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या काम करण्याच्या पध्दती मूळे भारतीय जनता पक्षाला सत्तेवर विराजमान होण्यासाठी फायदा झाला हे सर्वमान्य झाल्याचं दिसतं. त्यानंतर भाजपा सोबत आयपॅक संस्थापक प्रशांत किशोर काडीमोड होण्याची कारणे अर्थकारणाशी असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणाली वरून देखील असू शकते. बिनसल्यावर सर्व माध्यमांसमोर पिकेनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवत खोलात न शिरता उत्तर देण्याचं टाळलं असावं. २०१५ साली पीके यांनी नितीशकुमार यांच्यासह जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न थोड्याबहुत प्रमाणात चालठकल कक्षेत यशस्वी झाला म्हणावं लागेल. ते नितीशकुमार यांच्या घरोबाचा आहेर घेऊन तिथचा पाहुणचार त्यांनी घेतला खर मात्र तिथे पण बिनसलं. तेलंगणा, बिहारमध्ये नितीशकुमार, पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांना केलेली मदत बरोबरीने इतरही काही ठिकाणी आंध्रा आणि आता काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना रणनीती यांनी दिलेला सल्ला यशस्वी ठरला. त्यामुळे पीके राजकीय वर्तुळात चर्चेचा व्यक्तिशः केंद्रबिंदू ठरतो. कॉंग्रेस आणि पिके यांच्या भेटीगाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक असतांनाच पीके कडून काही बशर्त अटी घालण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांच्या गोठ्यातून समजतं. पीकेनी पक्षाच्या नेतृत्वाच्या संबंधित बदल करत ते पद प्रियंका वाड्रा यांना द्यावे, पक्षातील नेते मंडळीचे सार्वजनिक आणि खासगी स्वरूपात ट्विटवर हॅडलिंग  बदल स्वतंत्र, पक्षातील महत्वाच्या सुधारणा,निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळावे, त्याचबरोबरीने देशभरात सर्व्हेक्षण करून उमेदवार निश्चिती बाबतीत स्वातंत्र्य द्यावे या अटी उपस्थित केलेला याव्यतिरिक्त देखील काही इतरही बातचीत झाली असावी मात्र साहजिकच स्वातंत्र्य चळवळीचा १५० वर्षांचा इतिहास असलेल्या कॉंग्रेसला पीकेच्या मागण्या आणि अटी जड स्वरूपातील असल्याने ते नाकारणे पक्षाला योग्य वाटलं असावं.  या घटनेत एक बाजू पाहिली तर सावधपणे दोन्ही बाजूंनी स्पष्टता ठेवत ट्विट केल्यामुळे आता पुन्हा चौथ्या बैठकिला दोन्ही बाजूंनी वाट मोकळी असल्याचं लक्षात येतं. मात्र सध्या देशातील कॉंग्रेस पक्षाची परिस्थितीत पाहता आता कॉंग्रेसने योग्य पावले उचलली पाहिजेत असं चित्र आपल्या सर्वत्र दिसून येते. 

पीकेवर मोदी खुश असतांना २०१४ पासुन भाजपा विरोधात पिकेचा पवित्रा का.?: - 

मुळात मोदींनी प्रशांत किशोर यांचे तोंड भरून कौतुक केल्यानंतर पीके यांना पक्षात सामील करून घेण्यासंदर्भात शहा आणि त्यांची बोलणी घडवून आणली होती मात्र शहा आणि त्यांच्यात बोलणी झाल्यावर प्रशांत किशोर यांना पक्षात रणनीतीकार किंवा पक्षसल्लागार होण्यासाठी डावल्यामूळे किंवा पक्षाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणात तडजोड होत नाही हा मतितार्थ संदेश त्यांना अमित शहा कडून मिळाल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. मोदींनी पक्षातील इतर देऊ केले असताना देखील पीकेनी ते न्रमपणे नाकारत माघार घेतली. अशा परिस्थितीत २०१४ नंतर पीके भारतीय जनता पक्षाच्या माघाव लागत धावपळीत आहेत.  देशासमोर कॉंग्रेसच्या सोबतीने २०२४ मध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते योग्य मुद्दे उपस्थित करून भारतीयला हरवण्याची पराकाष्ठा करीत असावेत आणि या निष्कर्षाअंती आता पुन्हा कॉंग्रेस आणि पिके यांच्या भेटीगाठीत काय निर्णय घेण्याचे ठरविले जाते हे पाहणं सोईस्कर ठरेल..!
मोबाईल नंबर .८१८०९४१२५५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...