मुख्य सामग्रीवर वगळा

का संतापले शिवप्रेमी बांधव ; काय आहे संतापाच्या पाठीमागील भावना........ जाणून घ्या

 गुगल आणि विकिपीडियावर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा समुद्री चाचे असा उल्लेख केल्याने शिवप्रेमी बांधवांमध्ये तिव्र संतापाची लाट उसळली आहे.

Updated: October 9, 2022 10:19:54 pm


गुगल आणि विकिपीडियावर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा समुद्री चाचे असा उल्लेख केल्याने शिवभक्त संतापले आहेत. याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर विकिपीडियावर दुरुस्ती करण्यात आली आहे. गुगल आणि विकिपीडिया हे दैनंदिन माहिती मिळण्याचे स्त्रोत समजले जातात. जगभरातील माहिती गोळा करण्यासाठी या दोन माध्यमांची मदत घेतली जाते. मात्र गुगल वर कान्होजी आंग्रे हा शब्द सर्च केल्यानंतर तिथे कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख पायरेट्स अर्थात समुद्रीचाचे असा करण्यात आल्याचं रविवारी दिसून आलं यानंतर याच्या समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात समुद्र किनारी Nevy मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून सारखेल कान्होजी राजे आंग्रे यांना ओळखले जाते. ब्रिटिश डच पोर्तुगीज यांची अनेक आक्रमण त्यांनी परतावून लावली. भारतीय नौदलाकडून त्यांना मेंटोर म्हणून बघितले जाते. अशा कान्होजी राजे आंग्रे यांचा उल्लेख गुगलवर समुद्रीचाचे असा केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शिवभक्तांनी आणि इतिहास प्रेमींनी यावर आक्षेप नोंदवला असून यासाठी एक मोहीम सुरू केली आहे.

हिंदवी स्वराज्याच्या नौदलाचा प्रमुख सरखेल, अठरा किल्ले आणि सलाना दोन कोटी महसूल आलेल्या भू भागाचा कर्तुम अकर्तुम अधिपती. किमान अडीचशे गलबत, गुराब, मचवे, फ्रिगेट चे दल बाळगणारा सेनानायक. ज्याच्या शिक्क्याच्या “दस्तका” शिवाय इंग्रज – पोर्तुगीज आदी पश्चिमी सत्तांचे एकही जहाज पश्चिम सागर भ्रमण करु शकत नव्हते असा सागराधीपती. ज्याने एकहाती इंग्रज आणि पोर्तगीज यांचा सागरी उन्माद उधळून लावत मराठा जरी पटक्याचा दरारा सागरावर प्रस्थापित केला, अशा विराचे पायरट हे वर्णन समस्त भारतवासीयांच्या करीता अपमानास्पद आहे. यावर आक्षेप नोंदवणे गरजेचं आहे.

– रघुजीराजे आंग्रे कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज

आक्षेप कसा नोंदवाल

गुगलवर जायचं, कान्होजी आंग्रे सर्च करायचं- त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर जिथे हे pirate लिहिलेलं दिसतंय त्या पुढे उजव्या कोपऱ्यात ३ : उभे डॉट्स असतील त्यावर क्लिक करुन incorrect असा फीडबॅक नोंदवा असे आवाहन शिवभक्तांनी केले आहे.
धन्यवाद..! आपणांस ही उपयोगी वाटली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना सहाजणांना पाठवायला विसरू नका..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...